जयसिंह आणि धैर्यशील हे काका-पुतणे मतदान करणाऱ्या जनतेला या प्रश्नांची उत्तरे देतील का?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सलग ३५ वर्षे सत्तेत होते. त्यांच्या नावावर जयसिंह व धैर्यशील या काका-पुतण्यांनी पतसंस्था काढल्या, पण या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावले. शिवरत्न सत्तेच्या यशोशिखरावर असताना माळशिरस तालुक्यात एमआयडीसी झाली नाही. जुलमी राजवट राबवून अकलूजकरांवर वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय अत्याचार केले. एकाधिकारशाही व झुंडशाही राबवली याबाबत जयसिंह व धैर्यशील काका-पुतणे मतदारांना उत्तरे देतील का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
राजकारणात गॉडफादर असतो. तो संधी देतो, आपली उन्नती करतो, खंबीरपणे मागे उभा राहतो. २०१९ पर्यंत खा. शरद पवार हे शिवरत्नचे गॉडफादर होते. नंतर मोहिते पाटलांचा भाजपात प्रवेश झाला, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजितसिंहांचे गॉडफादर झाले. फडणवीस यांनी शिवरत्नला ताकद दिली, वलय दिले. पुन्हा मान प्रतिष्ठा दिली. राजकारणात गॉडफादर हे एक असे जहाज असते ते समुद्रातून तुम्हाला पैलतीराकडे घेऊन जाते. मात्र तुमच्याकडे संयम हवा, धीर हवा. तो संयम आमदार रणजितसिंहांकडे निश्चितच होता. मात्र जयसिंह आणि रणजितसिंह यांच्यात पहिल्यापासूनच एक सुप्त संघर्ष आहे. त्यामुळेच जयसिंहांनी धैर्यशील यांच्यात हवा भरली आणि धैर्यशील यांनी उभा राहण्याचा चंग बांधला. पुन्हा शिवरत्नने गॉडफादर बदलला, शरद पवारांचे नेतृत्व स्विकारून राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयसिंहांनी मुलाखतीत सांगितले, आम्ही “रणजितसिंहांना वाळीत टाकले आहे. जातपंचायतीत “वाळीत टाकणे” हा शब्द उच्चारला आणि सिध्द झाल्यास दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आहे. जयसिंहांना आमचा प्रश्न आहे “स्वत:च्या पुतण्याबद्दल असे शब्द उच्चारत असाल तर इतर जातीधर्माबद्दल तुमच्या मनात किती व्देष आणि तिरस्कार असेल?
माळशिरस तालुक्यात एससीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बौध्द समाजाला माळशिरस राखीव मतदार संघात २००९ पासून उमेदवारी का दिली नाही? यास तुमची सडक्या डोक्यातील कुजकी विचारधाराच आहे हे तुम्हाला कबूलच करावे लागेल. धैर्यशील हे आमदार रामभाऊ सातपुते यांच्याबद्दल बोलताना “तुझे पार्सल बीडला पाठवितो” अशा एकेरी शब्दात बोलतात. २००९ साली विजयसिंह मोहिते पाटील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिल्यानंतर तिथल्या जनतेने असे शब्द उच्चारले होते का? कर्जत-जामखेडला आमदार रोहित पवारांना तुझे पार्सल बारामतीला पाठवितो असे कधीच ऐकावे लागले नाही. धैर्यशील मोहिते पाटील तुम्ही राजकारणाला स्वत:ची खाजगी मालमत्ता समजता का? एका दलित समाजातील आमदाराबद्दल आपण जपून आणि योग्य शब्दात बोलले पाहिजे. (शेवटी तुम्ही आहातच गुन्हेगार वृत्तीचे, तुमच्याकडून अपेक्षा तरी काय करायची?)
माळशिरस तालुक्यात एमआयडीसी नसल्याने तालुक्याच्या गावागावातील तरूण, तरूणी शहरात नोकऱ्यासाठी कंपनी, कारखान्यात आहेत. ते इकडे मतदानासाठी येऊ शकत नाहीत यास तुम्ही जबाबदार आहात. आज माळशिरस तालुक्यात तुम्ही पतसंस्था काढल्या, मात्र तुम्हाला चालविता आल्या नाहीत. त्या मोडीत निघताना हजारो कुटुंबे उध्वस्त झाली, यास तुम्ही दोघे काका-पुतणे जबाबदार आहात. तुम्ही तालुक्यातील जनतेचा आर्थिक कणा कमकुवत करून टाकला हे तुम्हाला मान्य आहे का? अकलूजच्या शिवाजी चौक, रामायण चौकात ५० ते ६० युवक चाळीशी पार केलेले आहेत त्यांची लग्नं नाहीत. कारण नोकरी व्यवसाय नाही. मात्र तिथल्या एकाच कुंंटुंबातील पंधरा पुरूष सदस्यांना तुम्ही संस्थेत विविध पदावर नोकरी दिली आहे. हनुमान तालीमजवळील घरटी एक महिला संस्थेत नोकरीला घेतली हा विषमतावाद तुम्ही गावात का रूजविला? गावचा गावगाडा चालविताना तुम्हाला दुनियादारी समजते की नाही ?
तुम्ही शिक्षक, कारखान्यातील कामगार, संस्थेतील कामगारांना, गाळेधारकांना तुमच्या प्रचारासाठी अत्यंत त्रास दिला. काका-पुतण्यांनो लक्षात ठेवा, रावणाची लंका सोन्याची होती ती राहिली नाही. तुम्ही तर फारच किरकोळ आहात. तुमचा दहशतवाद संपणार, तुमचा अन्याय, अत्याचार संपणार. कारण अकलूजची जनता मतपेटीव्दारे क्रांती करणार. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल हे ब्रीद आम्ही जनतेच्या मनावर अंतकरणावर कोरणार आहे. काका-पुतण्याची जुलमी राजवट नष्ट करणार आहे हे मात्र निश्चित!