ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांना दिल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान
राजकारण विरहित समाजोपयोगी कामांची आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनकडून दखल
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): स्वतःकडे कुठलीही सत्ता नसताना ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी सातत्याने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून जनहिताचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचे जेवढे लक्ष नसेल तेवढे लक्ष शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांचे जनहिताकडे असते. शेती महामंळाची जमीन वाटप, फलटण-पंढरपूर रेल्वे, गारवाड कॉरिडॉर एमआयडीसी, माळशिरस बायपास भूसंपादनाचा वाढीव मोबदला, शेती महामंडळाकडील मिळालेल्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये विनाशुल्क करण्यासाठी केलेले प्रयत्न आदी ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांच्या प्रचंड कामांचा आवाका पाहून आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनने त्यांना दिल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान केल्याने ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी नेहमीच शेतकरी यांच्यासह सुशिक्षित बेरोजगारांचाही विचार केला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी संबंधित मंत्री महोदयांच्या गाठीभेटी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्वतःकडे कुठलीही सत्ता नसताना जनहिताचे प्रश्न घेऊन मंत्रालयात हेलपाटे मारणाऱ्या ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांचे कार्य तोंडात बोटं घालायला लावण्यासारखेच आहे. हे काम आमदार, खासदार, मंत्री यांचे असते. पण प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या बेबंदशाहीच्या राजकारणामुळे ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांना ही धुरा हाती घ्यावी लागली. महाराष्ट्रात शेती महामंडळाची एकूण २७ हजार एकर जमीन वाटप केली असून त्यापैकी ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांच्या पाठपुराव्यामुळे माळशिरस तालुक्यात ६ हजार एकर जमिनीचे वाटप केले आहे. त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. तसेच ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी २०१२ ते २०२५ पर्यंत संघर्ष केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे २०१७ साली फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचा बजेटमध्ये समावेश झाल्याने १०० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला. ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन गारवाड कॉरिडॉर एमआयडीसी संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांनी एमआयडीसीसाठी ४५०० एकर जमीन देण्याची संमती दिली आहे. याचा सर्व्हेही पूर्ण झाला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असतानाही माळशिरस बायपास भूसंपादनाचा दर प्रति गुंठा एक लाख रुपये दिला होता. तर तालुक्यातील इतर २० गावात प्रति गुंठा चार लाख दर दिला होता. त्यामुळे याविरोधात ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी आंदोलन करून ॲडिशनल कलेक्टरकडे अपिल दाखल केल्यावर शेतकऱ्यांना प्रति गुंठा ६० हजार रुपये वाढ देण्यात आली. मात्र या विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करून एडिशनल कमिशनरकडे अपिल केल्यानंतर प्रति गुंठा दहा लाख रुपये असा निकाल लागला. त्याचबरोबर ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी शेती महामंडळाकडील मिळालेल्या जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला, तेव्हा याची परवानगी विनाशुल्क मिळाल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. सत्ता कुणाचीही असो, आमदार, खासदार कुणीही असो, माळशिरस तालुक्याला औद्योगिक नगरी बनविण्याबरोबरच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे धडपडत राहिले, मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊ लागले. म्हणूनच तालुक्यातील प्रश्न चव्हाट्यावर येऊन ते मार्गी लागू लागले. ते उच्चशिक्षित असल्याने व नि:स्वार्थी भावनेने काम करीत असल्याने सर्व पक्षांतील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी त्यांना या कामात मोलाची मदत केली आहे. राजकारणापासून अलिप्त राहून जनहिताची, विकासाभिमुख कामे करणाऱ्या ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांची आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनने दखल घेऊन त्यांना दिल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान केला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
