रामभाऊ सातपुते यांच्या झंझावाताने उत्तम जानकर वैफल्यग्रस्त, भाषेची पातळी घसरली
उत्तम जानकरांना आमदारकी म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्याची जनतेतून चर्चा
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): रामभाऊ सातपुते यांनी पाच वर्षे काय केसं उपटली का? जनतेने सातपुते यांना जोड्याने हाणावे अशी अत्यंत खालची भाषा वापरुन आमदार उत्तम जानकर यांनी नुकतेच आपल्या अकलेचे तारे तोडले. पण आपल्या सहकाऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरविणाऱ्या उत्तम जानकरांना रामभाऊ सातपुते यांचा गत पाच वर्षातील विकास दिसला नाही का? रामभाऊ सातपुते यांनी फक्त पाच वर्षांत गेल्या चाळीस वर्षांपासून मोहिते पाटलांनी विकासापासून वंचित ठेवलेल्या विरोधकांच्या गावांचा “न भूतो न भविष्यति” असा विकास केला. त्यामुळे रामभाऊ सातपुते यांना मोहिते पाटील व उत्तम जानकरांची युती असतानाही १ लाख ८ हजार ५५६ मतं देऊन जनतेने डोक्यावर घेतले. अगदी थोडक्या मतांनी रामभाऊ सातपुते यांचा पराभव झाला असला तरी पूर्वीसारखाच माळशिरस तालुक्यात त्यांचा झंझावात असलेला पाहून उत्तम जानकर वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणूनच ते रामभाऊ सातपुते यांच्यावर वारंवार खालच्या पातळीवर टीका करून अकलेचे तारे तोडत आहेत. मात्र त्यांच्या घसरलेल्या भाषेची पातळी व ते जनतेला फाट्यावर मारत असल्याचे पाहून उत्तम जानकरांची आमदारकी म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्याचाच प्रकार आहे असा सूर जनतेतून निघत आहे.
रामभाऊ सातपुते हे ऊसतोड मजुरांचे सूपुत्र आहेत, त्यामुळे त्यांना पाण्याचं काय कळतंय? ही विद्यमान आमदार उत्तम जानकरांची कसली भाषा? हाच निष्कर्ष उत्तम जानकरांना लावायचा म्हटले तर ते लाकूडतोड्याचे सूपुत्र आहेत. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी त्यांनी चंदन तस्करीही केली आहे. मग यांना तर ढेकळं कळतंय? पूर्वी कोण काय करत होते, त्यापेक्षा त्यांनी आता कुठली कामे केली आहेत ते पाहिले पाहिजे. मोहिते पाटलांचे राजकारण हे सूडाचे राजकारण होते. जे आपल्या विरोधात काम करतात त्या गावांनाच मोहिते पाटलांनी कधी निधी दिला नव्हता. भणंग अशी विकासापासून कोसो दूर असलेली कित्येक गावं पश्चिम भागात होती. त्या गावांचा कायापालट करण्याचे काम रामभाऊ सातपुते यांनी केले. माळशिरस पूर्व भागात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रामभाऊंची तक्रार करीत असत. फडणवीस साहेबांसमोर यांचे दोनतीन वेळा वाजलेही होते. म्हणूनच त्यांनी पश्चिम भागावर फोकस करुन त्या भागाचे नंदनवन केले. तर अकलूजसह परिसरातील अनेक लोकांची अनेक कामे त्यांनी केली आहेत. पण उत्तम जानकर तुम्ही काय केले? सेटलमेंट आणि फक्त सेटलमेंट! मोहिते पाटलांच्या विरोधातील मुद्दा काढा, सेटलमेंट करा! सुमित्रा पतसंस्थेतील ठेवीदार व फसवणूक झालेल्या कर्जदारांच्या अश्रूंचे भांडवल करा, सेटलमेंट करा! दिनकर भोसले आत्महत्या प्रकरणाचे भांडवल करा, सेटलमेंट करा! मेलेल्या मढ्यावरच्या टाळूवरचे लोणीही तुम्हाला पुरले नाही. तुमच्याच सहकाऱ्यांनी विरोधकांचा कारखाना सुरू होईल म्हणून स्वतःच्या जमिनी दिल्या, पैसे दिले. तुम्ही काय केले? वेळापूरात हवेली बांधली आणि कारखाना विकला, सहकाऱ्यांना फसवले. आणि आता रामभाऊ सातपुते यांच्या रुपाने मोहिते पाटलांचा खमक्या विरोधक तयार झाल्याने आपल्या अस्तित्वासाठी मोहिते पाटलांशी जुळवून घेतले. पण तुमच्या या अनैसर्गिक युतीला सुध्दा रामभाऊ सातपुते पुरून उरले. तुमच्या गावात भाजपाची शाखा काढली, तिथे जेसीबीच्या माध्यमातून रामभाऊ सातपुते यांच्यावर फुलांची उधळण झाली. अकलूजमध्येही भाजपाच्या सोळा शाखा काढल्या. रामभाऊ सातपुते यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणूनच तुम्ही डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागू लागलाय. सतत मीडियावर यायचे आणि रामभाऊ सातपुते यांना खालच्या पातळीवर बोलायचे हे आता उत्तम जानकरांचे नेहमीचेच झालंय. उत्तम जानकरांना आता स्वप्नातही रामभाऊ सातपुतेच दिसत आहेत. एखाद्याबद्दल बोलताना थोडे तरी तारतम्य बाळगायला हवं. तुम्ही आमदार आहात, गल्लीतील गुंड नाही. रामभाऊ सातपुते यांनी केसं उपटली का? त्याला जोड्याने हाणावा, हरामखोर, नालायक अशी शिवीगाळ करुन उत्तम जानकरांना काय दाखवायचे आहे? तुम्ही रामभाऊ सातपुते यांना विकृत म्हणता, तुमच्यातच विकृती ठासून भरलेली दिसून येते. रामभाऊ सातपुते यांनी इतकी खालची भाषा कधीच कुणाला वापरली नाही. आणि मुख्यमंत्री, इतर मंत्री यांच्याबद्दल बोलताना पण ‘मी लढवय्या आहे, माझी योग्य कामं मी कुणाच्याही छातीला धरुन करुन घेईन’ अशी उर्मट भाषा आमदार उत्तम जानकर वापरतात. राहिला विषय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब निंबाळकर यांचा, तर वेळापूरातील काही प्रकरणे आपणच त्यांना दमदाटी करून करण्याचा प्रयत्न करत होता, प्रांत कार्यालयात सारखे तळ ठोकून बसत होता म्हणून आपल्या भीतीपोटीच ते अकलूज सोडून गेले. आणि खापर मात्र रामभाऊ सातपुते यांच्यावर. व्वा रे व्वा! एकंदरीत केंद्रासह महाराष्ट्रातही भाजपाची सत्ता असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही जयकुमार गोरे झाल्याने व ते रामभाऊ सातपुते यांचे खास मित्र असल्याने उत्तम जानकरांची आमदारकी म्हणजे बिन पगारी फुल अधिकारी अशाच पध्दतीची झाली आहे. त्यामुळे हतबल होऊन वाचाळवीराप्रमाणे ते सातत्याने रामभाऊ सातपुते यांच्यावर तोंडसुख घेत असले तरी यावरुन त्यांच्यावरीलच संस्कार दिसून येतात अशा प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील सुजाण नागरिकांतून उमटत आहेत.