जातचोर उत्तम जानकरांना साथ देणारे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ…!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): जन के लिये लड़नेवालों को धन करे बरबाद, कोम पे पड़ा घन तो भी पुतले जैसा तेरा तन, मन मरा हैं तेरा रे तुझे धन ने किया बरबाद…। अशी अवस्था जातचोर उत्तम जानकरांना साथ देणाऱ्या एससी समाजातील बहुतांशी कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे उत्तम जानकरांना साथ देणारे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया एससी समाजातील कार्यकर्त्यांतून उमटत आहेत.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी समाजाला राजकीय आरक्षणाबरोबरच शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे एससी समाज उच्चशिक्षित होऊन नोकरदार झाला. बरेचजण आयएएस, आयपीएस अधिकारी झाले, पण इतरांच्या तुलनेत कमीच आहेत. मात्र बोगस जातीच्या दाखल्याआधारे उत्तम जानकर यांच्यासारखे इतर समाजातील डोमकावळे एससी समाजात घुसखोरी करीत असताना एससीमधीलच काहीजण आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी जातचोराला समर्थन करीत आहेत. काहीजण तर नारदमुनीसारखे काम करुन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. मात्र ज्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आंबेडकरी चळवळ भिनलेली आहे ते अशांच्या गळाला लागत नाहीत. उत्तम जानकरांनी आपणावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे या अविर्भावातच आपण खूप मोठे नेते असल्याच्या थाटात काहीजण वावरत आहेत. परंतु पैशापुढे आंधळे झालेल्या व मानमरातबामुळे सरड्यासारखे फुगलेल्या या कार्यकर्त्यांना आपण आंबेडकरी चळवळीचे किती मोठे नुकसान करतोय याचे थोडेही भान राहिले नाही. जेव्हा हे जातचोर उत्तम जानकर माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती झाले तेव्हा त्यांचे काम पाहून एक कार्यकर्ता आमच्याजवळ त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत होता. पंचायत समितीच्या माध्यमातून ते जर कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसतील तर मग ते आमदार झाल्यानंतर काय दिवे लावतील? वास्तविक पाहता उत्तम जानकर आमदार झाल्यावर ते कार्यकर्त्यांना न्याय देतील किंवा न देतील हा मुद्दा गौण आहे, मात्र यामुळे आमदारकीचा खरा लाभार्थी वंचित राहणार आहे, तोही आपल्यातीलच घरभेद्यांमुळे! आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या मुखवटाधाऱ्यांमुळे तर चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील पोटभरू मुखवटाधारी ओळखून स्वाभिमानी एससी समाजाने कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणाऱ्या संधीसाधूंपासून सावध होऊन जातचोर उत्तम जानकरांची एससी समाजातील घुसखोरी थांबविण्यासाठी जीवाचे रान करावे अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील एससी समाजातून होताना दिसत आहे.