कार्य आणि कर्तृत्वामुळेच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे लोकसभेची जबाबदारी, तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची लवकरच गच्छंती!
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): २०२१ मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या काळात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. प्रभावी व्युहरचना, संघटनात्मक पक्षाची बांधणी आणि राजकारणाच्या सारीपाटावरील सोंगट्या कुशलबुध्दीने हलवूनआमदार समाधान आवताडे यांना एकहाती विजय मिळवून दिला. निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर पंढरपूर येथेच तळ ठोकून होते. (२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयसिंह मोहिते पाटील अकलूजमध्येच तळ ठोकून राहिले आणि मुलाखतीत “मी राजकारणाच्या सोंगट्या हलवितो” असे म्हटले. परंतु पुत्र संग्रामसिंहाचा वॉर्ड नंबर तीनमध्ये पराभव होताना या सोंगट्या कुठे हरविल्या होत्या? असा अकलूजकरांचा जयसिंहांना सवाल आहे.) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पक्ष हितासाठी झोकून काम करण्याची क्षमता पाहून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पुणे लोकसभा पक्षनिरीक्षक नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेतृत्व म्हणून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पुढे आणले जात आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्याची जबाबदारी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांवर सोपविण्यात आलेली आहे. माढा लोकसभा निवडणूक उमेदवार निवड समितीच्या पक्षनिरिक्षकांसमोर “तुम्ही जो उमेदवार देणार आहात तो मी निवडणून आणीन” त्यांच्या याच उदाहरणाचा आदर्श गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना समजल्यावर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाल्याचे समजते. भाजपा हा शिस्तीच्या पायावर उभा राहिलेला पक्ष आहे.(देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितले होते. “धैर्यशील यांनी पक्षश्रेष्ठींवर एक प्रकारे प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला होता.) खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे पक्षातील योगदान, कार्य, संघटनात्मक बांधणी याचा आदर्श आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ठेवायला हवा होता असा सूर आरएसएसच्या गोटातून निघत आहे. निवडणूक प्रक्रियेमध्येच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तुतारीचे उमेदवार व त्यांचे चुलत बंधू धैर्यशील यांची गळाभेट घेणे म्हणजे अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांना त्यांना निवडून आणण्याचा संदेशच देणेच होय. त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींकडून लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर उचित कार्यवाही होणार असून याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून कठोर पावले उचलली जाणार असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे असे भाजपाच्या वरिष्ठ गोटातून समजते.