खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांप्रमाणे शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी ऊसाला ३१०१ रूपये दर का दिला नाही?
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा शिवरत्नला
रोखठोक सवाल
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यात शेतकरी हाच केंद्रबिंदू होता. शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होणार नाही हे ओळखून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी साखर कारखान्याला स्वराज्य हे नाव दिले. कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेऊनस्वराज्य साखर कारखान्याने ऊसाला ३१०१ रूपये विक्रमी दर दिला. मात्र शिवरत्नच्या मोहिते पाटलांनी ऊसाला ३१०१ रुपये दर का दिला नाही? असा रोखठोक सवाल माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिवरत्नला विचारला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माळशिरस, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस स्वराज्य कारखान्याला घेण्यासाठी प्राधान्य दिले. स्वराज्य साखर कारखान्याने ४ लाख ८२ हजार गाळप केले. शिवरत्नने दोन कारखान्यात शेतकऱ्यांचे, कामगारांचे शोषणच केले आहे. त्यामुळे शोषणविरहीत समाज रचना निर्माण होण्यासाठी दहिगाव भागात स्वराज्य कारखान्याचे दुसरे युनिट सुरू करावे. तसेच माळशिरस तालुक्यात एमआयडीसी सुरू करून उद्योगधंद्यात माळशिरस तालुक्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
शिवरत्नने फायदा तिथेच विकास हे धोरण राबविल्यामुळेच माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनता आर्थिक विकासापासून वंचित राहिली व शिवरत्नवर व्यक्तीपूजेचे अवडंबर माजले. बापाच्या वयाच्या माणसांकडूनही पाया पडून घेताना शिवरत्नवरीलयुवा नेत्यांना थोडीशी सुध्दा लाज, शरम वाटतनाही. ज्या पायावर जनता आपली डोकी ठेवते ते पाय तेवढ्या लायकीचे तर आहेत का? माळशिरस तालुक्यातील शिवरत्नरूपी दगडाला शेंदूर लावला खरा, परंतु तो शेंदूर खरवडून काढणे खूपच कठीण झाले आहे असे अकलूजसह परिसरातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
शिवरत्नने इर्षा करायची असेल तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ऊसाला दिलेल्या दराशी करावी. ऊसापासून साखर तयार करताना फक्त धूरच वाया जातो. ऊसापासून वेगवेगळ्या बायप्रोडक्ट माध्यमातून योग्य दर दिला जातो. तो आदर्श खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी समाजासमोर ठेवला आहे. तो आदर्श शिवरत्नवाले समोर ठेवतील का? स्वराज्य कारखान्याप्रमाणे ३१०१ रूपये दर देतील का? शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी कारखानदारीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा भक्कम का केला नाही ? असा संतप्त सवाल माळशिरस तालुक्यातील करतो आहे.