दीडफुट्या नाऱ्या, औकातीत रहा!
राजकारण करीत असताना अनेक पक्ष प्रतिस्पर्ध्यांवर भुंकण्यासाठी काही पालतूंना पाळत असतात. अशाच प्रकारे भाजपाने पाळलेला कथित कोंबडीचोर नारायण राणे हा आहे. शिवसेनेवर भुंकण्यासाठी या नाऱ्याला भाजपाने पाळल्यानंतर तो इमानेइतबारे शिवसेनेवर भुंकण्याचे काम करीत असतो. तरीही या कोंबडीचोराचे भुंकणे शिवसेना सहन करीत आहे याबाबत काहीतरी लॉजिक असू शकते. मात्र या कोंबडीचोराची जीभ आता इतकी वळवळत आहे की, त्याने चक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातच भुंकायला सुरूवात केलीय. जेवत्या ताटावरून या नाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याचे तो अजूनही विसरला नाही म्हणूनच ॲड. प्रकाश आंबेडकरांनाही अटक करावी अशी मागणी तो वारंवार करीत आहे. यापूर्वीही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शरसंधान करताना लोकसभा निवडणुका जवळ आल्याने देशातील हिंदू धार्मिक स्थळावर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे निवडणुका होईपर्यंत वाराणसी, अयोध्या, मंगोलिय यांसह महत्वपूर्ण मंदीरे लष्कराच्या ताब्यात द्यावीत असे वक्तव्य केल्यानंतर हा कोंबडीचोर नाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकरांबद्दल भुंकला होता. तेव्हा “बेडका आगीशी खेळू नको!” असे संपादकीय लिहून आम्ही त्याचा समाचार घेतला होता. मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी एक म्हण आहे, त्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच राहणार असेच त्याच्या वक्तव्यावरून दिसतंय. महाराष्ट्रातील इतर पक्ष या नाऱ्याचे भुंकणे सहन करतील, मात्र दीडफुट्या नाऱ्या, आंबेडकर घराण्याबद्दल भुंकण्यापूर्वी तू औकातीत रहा हाच आमचा तुला इशारा आहे.
श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू राजकीय नेते असल्याने ते आपल्या चिंतनातून भविष्यातील राजकारणाबाबत वक्तव्ये करीत असतात. त्यापैकी त्यांची काही वक्तव्ये खरीही ठरलेली आहेत. सध्या आरक्षणावरून मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष सुरू असल्याने त्यांनी ३ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात दंगल होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. या वक्तव्यावरून भाजपाचा पालतू कोंबडीचोर नाऱ्याने ॲड. प्रकाश आंबेडकरांवर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आंबेडकरवाद्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची औकात दाखवलीच आहे. कारण आंबेडकरवाद्यांमध्ये कितीही गटबाजी असली तरी ते कुणी आंबेडकर घराण्याबद्दल बोललेले अजिबात सहन करीत नाहीत. मग तो कुणीही असू द्या, त्याला ते सळो की पळो करूनच सोडतात. मग हा नाऱ्या किस खेत की मूली! भीमसैनिकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोडले नाही तर तू कोण? सुरक्षारक्षकांच्या गराड्यात राहून आंबेडकर घराण्याबद्दल कुणीही भुंकेल. जर खरंच दम असेल तर नाऱ्या तुझ्या दोन पिल्लांना घेऊन मैदानात आलास तरी भीमसैनिक तूला प्रसाद देऊन तुझा यथोचित सन्मान करतील हे लक्षात ठेव. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आजपर्यंत सोशल इंजीनियरिंगचे राजकारण केलेले आहे. त्यांनी कधीही जातीपुरते मर्यादित राजकारण केलेले नाही. नेहमी बहुजन समाजाला सोबत घेऊनच त्यांनी राजकारण करायला सुरूवात केल्याने अलीकडच्या काळात महाराष्ट्रभर वंचितचे प्रस्थ वाढत आहे. याचा पोटशूळ आंबेडकरद्रोही राजकारण्यांना उठल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यामुळेच नाऱ्यासारख्यांना श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भुंकायला सोडले जात आहे. पण या नाऱ्याला भीमसैनिकांचे इंजेक्शन सहन होणार नाही याची कल्पना नसावी. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आजपर्यंत अनेकांना आमदार केले. परंतु त्यांना प्रस्थापितांची चाकरी करायची असल्याने नितीमत्ता खुंटीला टांगून ते वंचितला सोडून निघून गेले. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ठरविले असते तर ते केव्हाच केंद्रात मंत्री झाले असते. त्यांना हवे ते मंत्रीपद द्यायला प्रस्थापित पक्ष तयार झाले होते. पण त्यांनी स्वाभिमानाचे, आत्मसन्मानाचे राजकारण केले. आपल्या भाषणातून ॲड. प्रकाश आंबेडकर मनुवादी पक्षांचे अजेंडे उघड करीत असल्याने व राजकीय परिस्थितीची मुद्देसूद मांडणी करून जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत असल्याने कोंबडीचोर नाऱ्याच्या माध्यमातून त्यांना टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. पण एखादा जर सारखाच भुंकायला लागला तर त्याला इंजेक्शनच द्यावेच लागते. मात्र भीमसैनिकांची सुई इतकी मोठी आहे की ती कुठे टोचली तर कुठे निघेल हे सूज्ञांना चांगलेच माहिती आहे. वास्तविक पाहता कोण हा नारायण राणे? कणकवलीतील गुंड असलेल्या या नाऱ्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले, पण त्यांच्या हयातीतच हा दीडफुट्या त्यांना सोडून गेला. त्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तो नेहमी भूंकत असतो. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्याच्यावर शेलक्या शब्दात शब्दप्रहार करीत त्याला सोलून काढत असतात, तरीही त्याचे भुंकणे सुरूच असते. मात्र शिवसेनेसह इतर पक्ष जसे गप्प बसतील तसे याचे बळ वाढून आपण कुणावरही भुंकलो तरी आपल्याविरोधात कुणी ॲक्शन घेणार नाही असा समज या कोंबडीचोराचा झाला असेल. म्हणूनच त्याने आंबेडकर घराण्यावर भुंकण्याचे धाडस केले. पण जसे इतर गप्प राहतात तसे आंबेडकरवादी अजिबात गप्प राहणार नाहीत. आंबेडकरवादी लोकशाही मार्गाने आपली वाटचाल करीत आहेत. समाजकारण, राजकारण करून आपल्या समाजाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी झटत आहेत. उगीच त्यांना डिवचू नकोस, नाहीतर तुला पळायला महाराष्ट्र पण पुरणार नाही हे लक्षात ठेव!