सेटलमेंट बादशहांमुळेच आंबेडकरी चळवळ पिछाडीवर…!
माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा पूर्वेतिहास पाहिला तर पूर्वीच्या पँथर्सनी खरंच खूप मोठं काम केलं आहे. जातीयवाद्यांशी, विषमतावाद्यांशी त्यांनी वेळोवेळी प्रखर लढा दिला. आज दोन चाकी, चार चाकी वाहन आणि विविध साधने व सोशल मीडिया आहे. पण त्यावेळी सायकल असायची, तर काहींकडे ती सुध्दा नसायची… पोटाला पोटभर जेवणही मिळत नसायचं. तरीसुध्दा न थकता केवळ सामाजिक परिवर्तन हाच आमचा ध्यास…. सम्यक क्रांती अशा विविध वैचारिक बिरूदावलीने पागल झालेले हे सच्चे पॅंथर… यांनी विविध जातीयवाद्यांशी, सत्तेतील प्रस्थापितांशी चोख प्रत्युत्तर देऊन माळशिरस तालुक्यातील अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर घट्ट पकड ठेवून जरब बसवली… पण 2000 नंतरचे (अपवाद वगळता) अनेक कार्यकर्ते हे पूर्णपणे व्यावसायिक निघाले, सेटलमेंट बादशहा निघाले. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी बनविण्यात आलेल्या विविध कायद्याचे, एखाद्या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणाचे भांडवल करून आरोपींकडून, पिडीतांकडून पैसे मिळवायचे असाही गोरख धंदा सुरू राहिला… आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ तिथून पिछाडीवर येऊ लागली.
आज आंबेडकरी चळवळीमध्ये (अपवाद वगळता) जे म्होरके आहेत त्यांच्या घरी नातेवाईकाचे स्वतःचे दोन नंबर धंदे आहेत. त्या दोन नंबर धंद्यांच्या संरक्षणासाठी हे लोक सातत्याने सामाजिक कार्यात काम करतात. मात्र अविर्भावात सांगतात की, मी फक्त समाजासाठी लढत आहे… अशा बाजारबुणग्यांना समाज ओळखत नाही. त्यांचा मानपान थाटमाट करतो, त्यांच्या पुढे पुढे करतो… अशा बाजारबुणग्यांचा एवढा लाड झाला की, ते जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अरे तुरे करू लागले, त्यांचा पानउतारा करू लागले, त्यांच्यावर आरोप ठेवू लागले… अरे ते कसे का असेना, पण त्यांनी चळवळ त्यांच्या जवानीत सांभाळून धरली म्हणून आज तू जवान झाला… पण या जवानीत आला की तू त्यांची मापं काढू लागला… बाबासाहेबांबद्दल एक गीत प्रचलित आहे, “तुझ्या दीड दमडीच्या पायी मी समाज विकणार नाही…..” पण यांनी दुसऱ्याकडे बोटं करायची, चळवळीचा शूर लढवय्या आहे असं सांगायचं, अन् दुसऱ्याला नावं ठेवायची… आणि स्वतः मात्र खूप मोठ्या चुका करायचं आणि चळवळीच्या नावाखाली त्यावर पांघरून टाकायचं… उत्तम जानकरशी असाच करार केला आणि आपली जात विकली… अशा भाडखाऊंना समाज डोक्यावर घेतो, हे बघताना खूप वाईट वाटतं. अरे कशासाठी यांना तुम्ही चळवळीचा बादशाह म्हणता…? कशासाठी यांना चळवळीचे नायक म्हणायचं…? अरे त्याची चळवळ एकच होती की मला आमदार व्हायचे… मोहिते पाटलांना चितपट करायचे… पण शेवटी त्या मोहिते पाटलांचेच त्याने खांद्यावर घेतलं. मोहिते पाटलांच्या विरोधात उत्तम जानकर यांना उचलून त्यांना काय मिळालं… ? बाबुजीचा ठिल्लू…? शेवटी स्वतःची जात सुद्धा विकावी लागली. या भाडखाऊंना मी फक्त एवढंच सांगतो की, आज अजूनही आम्ही तुमचे नाव स्पष्ट घेत नाही. तुम्ही सत्याचे बाजूने चला… मी मोठा, तो मोठा… दुसरे काय सगळे मादरचोत आहेत का? या तालुक्यात तुला फिरू सुद्धा दिले जाणार नाही अशी चळवळ आम्ही उभा करू… तू अजून पण पट्ट्या सावध रहा… आम्ही आहोत म्हणून तुझा श्वास चालू आहे… आठवले साहेबांकडे जायचं, निवेदनं द्यायची, कामं काढायची आणि त्यांना इथे नाव ठेवायची… त्यांची रिपब्लिकन चळवळ मोडीत काढायची… ही कुठली तुझी चळवळ…? आणि आठवले साहेब काय आहेत हे अख्ख्या माळशिरस तालुक्याला माहित आहे. पण तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला… राजाभाऊ सरवदे काय आहेत हे सर्वांना माहित आहे… त्यांनाही तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला… आणि त्यांना बदनाम करून तुम्ही तुमची भाकरी शेकता…? कशासाठी…? जास्त बोलायला लावू नका, आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल एवढेच लक्षात घ्या…
या वयातही ना. रामदासजी आठवले यांनी अनेक वर्षे संघर्ष करून फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केलं… आणि त्यांच्याबरोबर व त्यांच्या पाठीमागून आम्हीही फुले, शाहू, आंबेडकरांची ही चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करतोय… राजाभाऊ सरवदे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देतात… पण राजाभाऊ सरवदे चुकतात, अमुक करतात, तमुक करतात असे बोलता… त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करता… हरामखोरांनो, त्या माणसामुळे आजही तुमचे धंदे चालू आहेत हे लक्षात घ्या… त्यांनी जर मनात आणलं तर तुम्ही उध्वस्त व्हाल… त्यामुळे वेळीच स्वतःला आणि तुमच्या चांडाळ चौकडीला आवरा आणि स्वतःला शहाणे समजू नका. कोणीही या ठिकाणी कोणाला कमी नाही… पण “शीशे के घर में रहनेवालो दुसरों के घर पर पत्थर मारने का खयाल भी मत लाना… क्यूंकी पुरा समाज जानता है… शीशे के घर में कौन रहता है… और पत्थर के घर में कौन… तो संभल जाओ अभी वक्त है….” शेवटी शेरास सव्वाशेर खूप आहेत… तू सर्वत्र फिरत असल्यामुळे तुला काही चांगली अक्कल आली असेल… त्या अकलीच्या जोरावर तू इथल्या पोरा बाळांना न्याय देऊ शकशील… इथे घडणाऱ्या घटनांना शासन दरबारी मांडून, त्यांना थोडा तरी न्याय देशील, न्याय देण्यासाठी धडपड करशील असे समजूनच अनेकजण गप्प होते… पण आता तू आपल्याच समाजातील लढवय्या कार्यकर्त्यांची इज्जतच खायला, घालवायला लागल्यावर समाज तुला सोडेल का…? सर्व पॅंथर्सची तू अन् स्वतःला उच्चशिक्षित समजणाऱ्याने केलेली दिशाभूल, चळवळीच्या नावावर तुझ्याकडून झालेली फसवणूक त्यांच्या लक्षात आलेली आहे… त्यामुळे सध्या तरी तू आणि तुझ्या ढोंगी, स्वार्थी चळवळीतील तुझे मोहरे शांत रहा, तू कुठे आणि किती कमवले सगळ्याचाच हिसाब घ्यावा लागेल. तुझ्यासारख्या ढोंग्यांसाठी वामनदादांनी म्हटलंच होतं की…
तुझ्या हाती तूप आले, तुझ्या हाती साय…
अरे, पण समाजाचं काय गड्या समाजाचं काय…?
तुला आणि तुझ्यासारख्यांना समाजाने कधीही म्हणलं नाही की, आमच्यासाठी लढा… आमच्यासाठी मैदानात उतरा… तुलाच खाज होती, पण ती खाज तू पैसे कमवून घालवलीस… आणि अजूनही समाजाला मूर्ख समजतो. ही खूप मोठी चूक तर करतोस. तर इथून पुढे तू आहेस त्या ठिकाणी शांत बस… अन्यथा समाज तुला रस्त्यावरही फिरू देणार नाही. अरे, आंबेडकरवादी समाजाने रामदास आठवले यांच्यासारख्या वादळाला मुंबईत घाटकोपर येथे कपड्याच्या चिंध्या चिंध्या होईस्तोवर मारलं होतं. आणि याच समाजाने आज रामदास आठवलेंना डोक्यावर घेऊन त्यांची पूजा करीत आहेत… हेही लक्षात घे… पण तू यापैकी कोणच नाहीस. त्यामुळे तू आता मापं काढू नकोस… तुला माफ करावं यासाठी तू शांत हो… शांत हो…
कुठे काय झाले की आम्हीच तिथे जाणार. त्या प्रकरणात इतर कुणी येऊ नये असे यांना वाटते. कोण आहेत ही माणसे…? कुठून आलीत…? आंबेडकरी समाजाचे सर्वाधिकार यांना कुणी दिले…? हे समाजाचे मालक आहेत काय…? खरे तर हीच समाजाला लागलेली किड आहे. समाजाला लागलेला कलंक आहे. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे समाजकंटक आपण करीत असलेल्या दुकानदारीत इतर कुणी शिरू नये म्हणून स्वतःच्या पुढारपणाची जाहिरात जोमाने करीत आहेत. स्वतःची कितीही जाहिरात त्यांनी केली तर आमची कुणाचीच हरकत नाही. मात्र आम्हीच चांगले व इतर वाईट ही भूमिका किंवा अशी मानसिकता असणाऱ्या व्यक्ती ह्या बाबासाहेबांचे शुद्ध अनुयायी, आंबेडकरवादी असूच शकत नाहीत, होऊच शकत नाहीत. केलेल्या कामाचे श्रेय घेण्याच्या नादात समाजावर उपकार केले ही भाषा व पुढे आजपर्यंत होऊन गेलेल्या व सध्या हयात असलेल्या माळशिरस तालुक्यातील सर्वच आंबेडकरी नेत्यांना दुय्यम लेखून स्वतःला अव्वल एक नंबरी व दोन नंबरी म्हणत स्वतःच स्वतःची टिमकी वाजवत एकमेकांची पाठ थोपटत आहेत.
अन्यायग्रस्तांच्या मदत निधीतला मलिदा खा-खा खाऊन गब्बर सिंग झालेल्या लूटमारीच्या खलनायकांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. तुम्ही वीस वर्षांपूर्वी कोण होता…? तुमचे वाड-वडील काय करत होते…? तुमच्या बापजाद्यांची प्रॉपर्टी किती होती…? आणि आज तुम्ही कसलेही काम न करता वेगवेगळ्या ठिकाणी बंगले कसे बांधले…? इतके ऐशोआरामात जीवन कसे जगत आहात.? पोलिसांच्या एलसीबी फाईलमध्ये कोणाविषयी काय लिहिले आहे हे जरा वाचा… उगाच चमच्यांनी केलेल्या व करीत असलेल्या स्तुतीवर भाळून समाजातल्या इतर लहानमोठ्या नेते/कार्यकर्त्यांना ××× असे म्हणू नका… हे एवढं सांगायची काही गरज नव्हती, मात्र एक नंबरी आणि दोन नंबरी यांची हिम्मत पाहिली आणि मला राहवले नाही. मीही याच समाजाचा हिस्सा आहे, भाग आहे. हे एक नंबरी दोन नंबरी वाल्यांनो जरा जनाला नाही तर मनाला तरी लाजावे. अरे चमच्यांच्या गराड्यातून जरा बाहेर पडा आणि बघा तुमचे कोणी नाव जरी ऐकले तर तो दचकतो, त्याच्या पोटात भलामोठा मिरचीचा गोळा उठतो, गोरगरिबाचे रक्त पिणाऱ्यांनो आपल्यातील अंतःकरणात वसलेल्या रक्तपिपासू वृत्तीकडे जरा तटस्थ नजरेने पहा, अरेरे कुठे फेडाल हे पाप… जणू यांनी दोन नंबरचे धंदे टाकले नाहीत, केले नाहीत, समाजाची दलाली केली नाही… काय काय केले यापेक्षा काय काय केले नाही हे तपासून पहा, मग इतरांना शिव्या द्या. अरे थू तुमच्या जिंदगानीवर… या स्वयंघोषित भामट्यांसाठी तूर्तास इतकेच…!